एक लाख पुणेकर दररोज पितात दूषित पाणी !

Dilip KurhadeEditorial28/04/202525 Views

एक लाख पुणेकर दररोज पितात दूषित पाणी !

राज्यातील शहर असो किंवा गाव येथील शेवटच्या माणसापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेची कमी पडत आहे. राज्यातील शहरांसह ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल राज्याचे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तपासलेल्या एक टक्का पिण्याच्या पाण्याचे नमूने दूषित आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ३.३ टक्के पाण्याचे नमूने दूषित आहेत.याचा अर्थ एक लाख पुणेकर व पिंपरी-चिंचवडकर तर साडेतीन लाख पुणे जिल्ह्यातील अबालवृद्ध दूषित पाणी पित आहेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजार त्यावर होणारा कोट्यावधी रूपयांचा खर्च वेगळा म्हणावे लागले.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत नागरिकांना पाणीपुरवठा केलेल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नूमन्यांचे अणूजीव व रासायनिक घटकांचे विश्‍लेषण करून शास्त्रतोक्तपणे तपासणी केली जाते. आरोग्य प्रयोगशाळेसह राज्यात मिनी, उपविभागीय व महापालिकेचे प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळेत रँडमली स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या नमूने नियमित तपासले जातात. पाण्याचे नमूने तपासून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना उपायोजनांसंदर्भात सांगितले जाते. मात्र, यावर उपाययोजना होतेच याची काही शाश्‍वती देता येत नाही. कारण पुढीच्या वेळी पाणीपुरवठा होणाऱ्या इतर ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविले जातात . यामध्ये मिनी, उपविभागीय व महापालिकेच्या प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासल्यानंतर राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत हे पाणी नमूने पाठविले जाते. त्यामुळे शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणीचा अहवाल मिळेल याची खात्री नसते.

राज्य आरोग्य प्रयोगशाळेला जानेवारी २०२५ मध्ये पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून १६ हजार ८५१ पिण्याच्या पाण्याचे नमूने प्राप्त झाले होते. त्यापैकी एक टक्का पाण्याचे नमुने दूषित होते. तर ग्रामिण भागातील तीन हजार ४४५ पिण्याच्या पाण्याच्या नमून्यांपैकी साधारणत: साडेतीन टक्के पाणी नमूने दूषित असल्याचा अहवाल राज्य प्रयोगशाळेने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे एक कोटी लोकसंख्येचा विचार केला तर तब्बल दररोज चार लाख लोक दूषित पाणी पित असल्याचे दिसून येते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजार व त्यावरील औषधोपचारासाठी लोकांचे कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचा अंदाच वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्य  प्रयोगशाळेत राज्यभरातून आलेल्या शहर व ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या नमून्यांचे अणूजीव व रासायनिक घटकांची तपासणी केली जाते. दर महिन्याला त्याचा अहवाल आरोग्य संचालकांना पाठविला जातो. अनेक शहरात व ग्रामिण भागात होण्याऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यातील पिण्याचे पाण्याचे नमूने तपासणी करून संबंधितांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी सांगितले जाते पण काही उपयोग होत नाही .

राज्यातील नांदेड  जिल्ह्यात २६.४ टक्के, बीड जिल्ह्यात १८.७ टक्के, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) मध्ये १६.६ टक्के, जालना १२ टक्के तर उस्मानाबाद १७.७ टक्के दूषित पाणीपुरवठा होतो. कोकणातील रत्नागिरीत ११ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ टक्के दूषित पाणीपुरवठा होते. तर ठाणे शहरात १६.७ टक्के, भंडारा २२.२ व गोंदियातील तीस टक्के शहरी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल राज्य प्रयोगशाळेने दिला आहे.

दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, विषमज्वर सारखे आजार होऊ शकतात. पाण्याचे क्लोरिनेशन नीट झाले नसल्यास अपचनाचे विकार होऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे चांगल्या पद्धतीने क्लोरिनेशन करून पाणी  शंभर टक्के उकळून व थंड करून पिणे आवश्‍यक आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...