
विश्रांतवाडी येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून
जयंतीचा कार्यक्रम पाहून घरी जात असताना वाहनतळावर केला हल्ला
पुणे :विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहून गौरव तेलंगी , रवी काळी, शहारुख शेख व रेहान हे घरी जात होते. त्यांनी कॉमरझोन समोरील एअरपोर्ट कडे जाणारे रस्त्यावर पंचशिलनगर येथे वाहने पार्क केली होती. या ठिकाणी ते आले असताना त्यांचे ओळखीचे तोफीक शेख, समीर शिंदे, राजन दोरास्वामी व त्यांचे इतर चार ते पाच साथीदारानीं जुन्या भांडणाच्या कारणावरुन गौरव तेलंगी यास पालघन, कोयता, सिमेंन्टच्या विटांनी मारहाण करून, गंभीर जखमी केले. त्यात गौरव तेलंगी याचा खुन झाला.
या बाबतची हकीकत अशी गौरव तेलंगी याने तोफीक शेख याच्या बहिणी बराबर विवाह केले होता. याचा राग तोफीकला होता. यावरून त्यांची पूर्वीं भांडणे झाली होती. काल आरोपींनी तेलंगचा माग काढून हल्ला केला. घटनास्थळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे )निखील पिंगळे, परिमंडळ चार चे पोळीच उप आयुक्त चिलुमुला रजनिकांत , राजकुमार शिंदे , येरवडा सहा. पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर , प्रांजली सोनवने ,विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे , संपतराव राऊत पोलीस ,पोलीस निरीक्षक युनिट ४ गुन्हे शाखा कांचन जाधव , पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, शब्बीर शेख पोलीस भेट दिली.